'उभ्या आयुष्यात नागपुरात असं कधी पाहिलं नव्हतं' - हिंसाचारानंतर नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
'अजब मंजर है शहर का, कुछ समझ नही आता,
दुकाने खुली है, मगर ग्राहक नजर नही आता..
भुल गए हे लोक देश का कानून, भाई से भाई का नाता,
गरीबही भूखा मरता यहाँ, गरीबही नंगा सोता!
लड़ानेवाला कोई नेता लड़ाई मै शहीद नही होता...'
नागपूरमध्ये 17 मार्चच्या रात्री झालेल्या दंगलीनंतर व्यथित झालेल्या अॅड. राकेश दावधरिया यांनी या ओळीतून आपल्या भावना व्यक्त केल्या.
दावधरिया हे मुस्लिम बहुल भागात राहतात. त्यांनी माथी भडकवणाऱ्यांच्या नादी लागून आपलं नुकसान करुन घेऊ नका.
तर याच शहरातील एक व्यावसायिक अब्दुल खलिक यांना बोलताना रडू कोसळलं. देशात कुठेही दंगल-हिंसाचार झाल्याचं ऐकायला मिळालं असेल पण या शहरात असं कधीच पाहिलं नव्हतं. हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं असं ते म्हणाले.
या घटनेनंतर नागपूरकरांच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं सुरू आहेत.
17 मार्चला मात्र नागपुरात झालेल्या आंदोलनानंतर दंगल उसळली. एरवी शांत असलेल्या नागपूरकरांना दगडफेक, जाळपोळ सारख्या घटनांना सामोरं जावं लागलं.
ज्या परिसरात ही घटना घडली तिथं आता तणावपूर्ण शांतता आहे. दुकानं बंद आहेत. जागोजागी पोलीस पहारा देत आहेत.
पण कालच्या घटनांच्या खाणाखुणा आजही तिथं स्पष्ट दिसतात.


दुकानांच्या काचा फुटलेल्या आहेत, काही ठिकाणी दगड-विटांचा खच दिसतो, जमावानं जाळलेल्या गाड्यांचे सांगडे तसेच होते.
काही दुकानदार, नागरिक आपल्या घर आणि दुकानांसमोर उभे होते. बीबीसीनं काही प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला.
त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना नागपूरमध्ये जे घडलं ते अत्यंत चुकीचं होतं असं म्हटलं आहे.
'संपूर्ण आयुष्यात असं कधी पाहिलं नाही'
चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या रस्त्यावर दुकान असणारे आणि तिथेच राहणारे अब्दुल खलीक यांचे दुकान कालपासून बंद आहे. त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अब्दुल खलील यांना बोलताना रडू कोसळलं.

अब्दुल खालिक म्हणतात, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं काही घडल्याचं बघितलं नाही. आमच्या शहरात असलं काही कधीच घडत नव्हतं. देशात कुठेही काहीही होऊ द्या इथे काही होत नव्हतं, काल रात्री गोंधळ झाल्यापासून आमची दुकानं बंद आहेत. आम्ही दिवसभर रोजा पाळून नमाज पठण करायला गेलो होतो. परत येईपर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला होता. जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे. आम्हाला खूप त्रास होतोय.
त्यांच्याच बाजूला बसलेले सनी दावधरिया म्हणाले, "आमचं एवढं वय झालं पण असं काही कधी घडलं नव्हतं. ज्यांना हे काम करायचं होतं ते करून गेले आता आम्ही परिणाम भोगतो आहोत. काल रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. आमच्या घरातील बायका-पोरांवर दहशत बसली आहे. रोज काम करून आम्ही पोट भरतो. आता माहित नाही पुढे काय होईल");