36 बोगदे, 900 हून अधिक पूल; पाहा काश्मीर खोऱ्यातील चिनाब नदीवरील रेल्वेमार्ग
देशभर पोहोचलेलं रेल्वेचं जाळं काश्मीरच्या खोऱ्यात पोहोचायला स्वातंत्र्यानंतर 78 वर्षं लागली. नव्यानं पूर्ण झालेल्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईनमुळे राजधानी दिल्लीहून ट्रेन थेट श्रीनगरला पोहोचू शकेल.
दुर्गम पर्वतरांगा आणि काश्मीरची अस्थिर राजकीय परिस्थिती यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणं मोठं आव्हान होतं. ते कसं पूर्ण झालं आणि जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना त्याबद्दल काय वाटतं, याचा हा ग्राऊंड रिपोर्ट.