इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींच्या लग्नाची गोष्ट, नेहरु कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कसं पार पडलं लग्न?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
फिरोज गांधी हे आपल्या मुलीसाठी म्हणजेच इंदिरा गांधींसाठी जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती नाहीत, असं जवाहरलाल नेहरु यांचं मत होतं.
फिरोज ना हिंदू होते ना काश्मीरी. मात्र, हा मुद्दा नेहरुंसाठी फार महत्त्वाचा नव्हता. कारण, त्यांच्या स्वत:च्या बहिणी म्हणजेच विजयालक्ष्मी आणि कृष्णा यांचेही पती काश्मीरी नव्हते.
नेहरुंनी आपल्या बहिणींच्या लग्नाला बिलकूल विरोध केलेला नव्हता. मात्र, या दोन्हीही बहिणींचे पती ऑक्सफर्डमधून शिक्षण घेऊन आलेले होते तसेच त्यांचं घराणं उच्चभ्रू आणि समृद्ध असं होतं. विजयालक्ष्मी पंडित यांचे पती रणजीत पंडित हे बॅरिस्टर होते आणि संस्कृतचे उत्तम अभ्यासक होते.
दुसऱ्या बाजूला, फिरोज गांधी हे फारच सर्वसामान्य अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले होते. त्यांच्याकडे ना विद्यापीठाची पदवी होती, ना नोकरी होती, ना नियमित उत्पन्नाचं एखादं साधन होतं.
कॅथरीन फ्रँक यांनी 'इंदिरा: द लाईफ ऑफ इंदिरा नेहरु-गांधी' या इंदिरा गांधींवरील चरित्रात लिहिलंय की, "फिरोज हे जोरजोरात तसेच तोंडावर स्पष्टपणे बोलणारे व्यक्ती होते. तर नेहरु याहून अगदी उलट म्हणजेच खूपच सभ्य, सुसंस्कृत आणि मोजून-मापून बोलणारे व्यक्ती होते."
कॅथरीन यांनी पुढे लिहिलंय की, "इतर वडिलांप्रमाणेच नेहरुंनाही आपल्या मुलीला गमवायचं नव्हतं. इंदिरा गांधींच्या बिघडलेल्या तब्येतीचा मुद्दाही होताच. त्यांच्या पत्नी कमला नेहरु यांनीदेखील मृत्यूशय्येवर असताना इंदिरा आणि फिरोज यांच्या लग्नाबाबत असलेली तीव्र साशंकता व्यक्त केली होती. कमला यांच्या मते फिरोज स्थिर आणि विश्वासार्ह व्यक्ती नव्हते. "


नेहरुंच्या बहिणींचाही होता आक्षेप
जेव्हा इंदिरा गांधींनी फिरोज यांच्यासमवेत लग्न करण्याची इच्छा आपल्या आत्याकडे म्हणजेच कृष्णा यांच्याकडे व्यक्त केली तेव्हा त्यांनी इंदिरा यांना थोडी प्रतीक्षा करण्याचा तसेच आणखी काही मुलांना भेटण्याचाही सल्ला दिला.
कृष्णा हठीसिंग आपल्या 'वुई नेहरुज्' या पुस्तकात लिहितात की, "यावर इंदिरानं ताडकन विचारलं की, असं का? तुम्ही तर अवघ्या दहा दिवसांतच राजा भाई यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी तर फिरोजला कित्येक वर्षांपासून ओळखते. मी आणखी प्रतीक्षा का करावी आणि इतर मुलांना का भेटावं"इंदिरा यांचा फिरोज गांधी यांच्याशी 26 मार्च 1942 ला अलाहाबादमध्ये विवाह झाला. " loading="lazy" width="549" height="549" style="aspect-ratio:549 / 549" class="bbc-139onq"/>
फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
दोन महिन्यांनंतर इंदिरा आणि फिरोज आपल्या हनीमूनसाठी काश्मीरला रवाना झाले.
तिथून इंदिरा गांधींनी नेहरुंना तार पाठवली.
"आम्ही तुम्हाला इथली थंड हवा पाठवू शकलो असतो, तर बरं झालं असतं...."
यावर नेहरुंची प्रत्युत्तर देणारी तार तातडीनं आली,
"मात्र, तुझ्याकडे तिकडं आंबे नाहीयेत!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)