राधे माँ यांचा सुखविंदर कौर ते 'देवी माँ' हा प्रवास कसा झाला? वाचा त्यांची कहाणी

राधे माँ नेहमीच लाल वस्त्र परिधान करून आणि हातात त्रिशूळ घेऊन भक्तांसमोर येतात.
फोटो कॅप्शन, राधे माँ नेहमीच लाल वस्त्र परिधान करून आणि हातात त्रिशूळ घेऊन भक्तांसमोर येतात.
  • Author, दिव्या आर्य
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

त्या चमत्काराचा दावा करतात. त्यांचे भक्त त्यांना 'देवी माँ' मानतात. त्या आहेत सुखविंदर कौर. मात्र भक्तांमध्ये आणि समाजात त्या 'राधे माँ' या नावानं प्रसिद्ध आहेत.

भारतात बाबांची मोठी गर्दी झालेली असताना ज्या महिलांना यात स्वत:चं स्थान निर्माण करता आलं आहे, अशा मोजक्या महिलांपैकी त्या एक आहेत.

भक्ती, भीती, अंधश्रद्धा आणि रहस्याच्या या दुनियेत स्वत:च स्थान निर्माण करणं कठीण आहे. 'राधे माँ' यांच्या या दुनियेचा धांडोळा बीबीसीनं घेतला आणि प्रत्येक स्तराचा उलगडा केला.

लुई वुताँ आणि गुची सारख्या महागड्या ब्रँडच्या पर्स हातात घेऊन, सोनं आणि हिऱ्याचे दागिने आणि फॅशनेबल कपडे परिधान करून महिला गोळा होत आहेत.

या महिला 'राधे माँ' च्या भक्त आहेत. दिल्लीत जवळपास मध्यरात्री 'राधे माँ' यांचं दर्शन सुरू होतं. या महिला त्यासाठीच आल्या आहेत.

स्वत:ला 'चमत्कारी माता' म्हणवून घेणाऱ्या राधे माँ यांना संतासारखं साधं जीवन आवडत नाही. त्यांची वेशभूषा साधी नाही, त्या मोठे प्रवचन देत नाहीत. इतकंच काय, त्या भक्तांना सकाळी भेटत नाहीत.

बीबीसीनं जेव्हा त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या मोकळेपणानं म्हणाल्या, "हे सत्य आहे की चमत्कार केल्यावर नमस्कार होतो. एरवी कोणी एक रुपयादेखील देत नाही. मात्र जेव्हा त्यांना चमत्काराचा अनुभव येतो, त्यांची कामं होतात, तेव्हा ते दान करतात."

दिल्लीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राधे माँ.
फोटो कॅप्शन, दिल्लीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राधे माँ.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या 'चमत्कारांच्या' अनेक कहाण्या आहेत. त्यांचे भक्त दावा करतात की ज्यांना मूलबाळ नसतं, त्यांना राधे माँ च्या आशिर्वादानं अपत्यं होतात. ज्यांना फक्त मुलीच होत असतात, त्यांना मुलं होतात. ज्यांचा व्यापार तोट्यात सुरू असतो, त्यांना नफा होऊ लागतो. आजारी लोक निरोगी होतात.

देवाचं रुप असल्याचा आणि चमत्कार करण्याचा दावा फक्त 'राधे माँ'च करत नाहीत. भारतात असे अनेक स्वयंघोषित बाबा आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच चालली आहे.

यातील काही जणांवर भ्रष्टाचारापासून लैंगिक हिंसेपर्यंतचे अनेक आरोपदेखील झाले आहेत. राधे माँ यांच्यावर देखील 'काळी जादू' करण्याचे आणि एका कुटुंबाला हुंडा घेण्यासाठी चिथावणी देण्याचे आरोप झाले. मात्र पोलिसांच्या तपासात सर्व आरोप फेटाळले गेले.

यानंतर देखील हजारो लोक या बाबा आणि देवींच्या दर्शनासाठी येत असतात. 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये अशाच एका बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 120 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

प्राध्यापक श्याम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत. नागपूरमध्ये आम्ही त्यांना भेटलो.

ते म्हणतात, "परमेश्वराचा साक्षात्कार होणं हाच जीवनाचा उद्देश असल्याचा सामान्य संस्कार बहुतांश भारतीय कुटुंबांमध्ये केला जातो. त्यासाठी ध्यान, प्रार्थना, भजन-कीर्तन केलं तर सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त झालेल्या बाबा किंवा देवीला लोक भगवान मानतात. लोकांना वाटतं की ते चमत्कार करू शकतात."

'राधे माँ'चे भक्त कोण आहेत?

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की गरीब लोक किंवा अडाणी, अशिक्षित लोक आहेत, ते या प्रकारच्या बाबा-बुवांमुळे प्रभावित होतात. याच प्रकारचे लोक भक्त असतात. मात्र राधे माँ यांचे अनेक भक्त श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांमधील आहेत.

मला ऑक्सफर्ड विद्यापीठातील सैद बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेणारे आणि एक शैक्षणिक कन्सल्टन्सी चालवणारे पुष्पिंदर भाटिया भेटले. त्या रात्री ते देखील त्या महिलांबरोबर दर्शनासाठी रांगेत होते.

ते मला म्हणाले की 'दैवी शक्तींच्या मानवी रुपाची' भक्ती करण्याचा विचार त्यांनी कधीही केला नव्हता.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

पुष्पिंदर म्हणाले, "सुरुवातीला माझ्या मनात प्रश्न होते की, देव मानवी रुपात येतो का? हे खरं असतं का? तुमचं आयुष्य बदलून जाईल, असा आशिर्वाद त्या देतात का? हे तथाकथित चमत्कार कसे होतात");