भारताच्या इशाऱ्यानंतर भगवान बुद्धांशी संबंधित रत्नांचा लिलाव स्थगित, नेमकं काय घडलं?

भगवान बुद्ध

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, सौतिक बिस्वास
  • Role, भारत प्रतिनिधी
  • Twitter,

भारत सरकारच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर भगवान बुद्धांच्या अवशेषांशी संबंधित चमकदार रत्नांच्या साठ्याचा लिलाव सध्या थांबवण्यात आला आहे.

बुधवारी (7 मे) हाँगकाँगमधील सदबीजमध्ये लिलाव केला जाणार होता. पण यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हा लिलाव ताबडतोब थांबवावा, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर सध्यातरी या शेकडो रत्नांचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. आधुनिक काळातील सर्वात आश्चर्यकारक पुरातत्वीय शोधांपैकी एक म्हणून या रत्नांचं वर्णन करण्यात आलं आहे.

या रत्नांचा लिलाव करणं हा भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

1898 मध्ये उत्तर भारतात मातीच्या ढिगाऱ्याखाली हे अवशेष सापडले होते. एक शतकाहून अधिक काळापासून हे अवशेष एका खासगी ब्रिटिश संग्रहात आहेत आणि ते बहुतांशपणे नजरेआड आहेत.

आता ही रत्नं त्या संग्रहातून बाहेर काढली जात असताना अशा रत्नांचा संग्रह करणाऱ्यांची त्या संदर्भातील उत्सुकताच वाढली आहे.

काय आहेत हे अवशेष?

जवळपास 1,800 मोती, माणिक, पुष्कराज, नीलमणी आणि नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या पत्र्यांच्या चमकदार साठ्यात ही रत्नं सापडली आहेत. ती पहिल्यांदा उत्तर प्रदेशात एका विटांच्या खोलीत जमिनीखाली दिसली होती. हे ठिकाण भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाजवळच आहे.

तसंच एक अस्थीकलश सापडला आणि त्यावर कोरलेल्या माहितीवरून तो खुद्द भगवान बुद्धांचाच असल्याचे स्पष्ट झाले.ही रत्नं आणि भगवान बुद्धाचे अवशेष यांच्या शोधामुळे पुरातत्वशास्त्राच्या जगात मोठी चर्चा झाली.

निकोलस चाऊ, सदबीज एशियाचे चेअरमन आणि एशियन आर्टचे वर्ल्डवाईड प्रमुख आहेत.

त्यांना वाटतं की, "हा पुरातत्वाशी संबंधित सार्वकालिक सर्वात असामान्य शोधांपैकी एक आहे."

आता या अवशेषांचा लिलाव होत असताना बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, भारताच्या पवित्र भूतकाळाशी इतक्या जवळून जोडल्या गेलेल्या या खजिन्याची विक्री नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?

या रत्नांमध्ये जवळपास 1,800 मोती, माणिक, नीलमणी आणि नक्षीकाम केलेले सोन्याचे पत्रे आहेत.

फोटो स्रोत, Courtesy: Sotheby's

1898 विल्यम क्लॅक्सटन पेप्पे या एका इंग्रज इस्टेट मॅनेजरनं पिपरहवा येथील एका स्तुपाचं उत्खनन केलं. पिपरहवा हे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील गाव आहे. ते लुंबिनीपासून जवळच दक्षिणेला आहे. लुंबिनी इथे भगवान बुद्धांचा जन्म झाल्याचं मानलं जातं.

विल्यम पेप्पे यांना या उत्खननात जवळपास 2,000 वर्षांपूर्वी विधी करून ठेवण्यात आलेले पवित्र अवशेष सापडले. त्यावर काही माहिती कोरलेली होती.

विल्यम क्लॅक्सटन पेप्पे या इंग्रज इस्टेट मॅनेजरनं स्तुपाचं उत्खनन केलं आणि त्यांना ही रत्नं सापडली

फोटो स्रोत, Courtesy Peppé family

फोटो कॅप्शन, विल्यम क्लॅक्सटन पेप्पे या इंग्रज इस्टेट मॅनेजरनं स्तुपाचं उत्खनन केलं आणि त्यांना ही रत्नं सापडली.

हे अवशेष इतका काळ लोटल्यानंतरही अबाधित राहिले होते. इतिहासकार या गोष्टीशी सहमत आहेत की हे अवशेष, भगवान बुद्धांच्या शाक्य कुळाचे वंशज आणि जगभरातील बौद्ध या दोघांचाही वारसा आहेत.

भगवान बुद्धांच्या हाडांचे अवशेष थायलंड, श्रीलंका आणि म्यानमारसारख्या देशांमध्येही विखुरले आहेत. तिथे या अवशेषांची पूजा केली जाते.

लिलाव करणारे आणि इतिहासकार यांची भूमिका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"भगवान बुद्धांच्या अवशेषांना बाजारात विक्री करता येईल अशी एखादी कलाकृती मानता येईल? आणि जर ते असे अवशेष नाहीत, तर मग त्यांची विक्री करणाऱ्याला त्यांचा लिलाव करण्याचा नैतिक अधिकार कसा काय आहे"पिपरहवाच्या स्तुपातील दगडी पेटीत, स्टीटाईट (दगडाचा एक प्रकार) दगडानं बनलेले चार कलश आणि रॉक क्रिस्टलपासून बनलेला एक कलश सापडला " loading="lazy" width="1024" height="682" style="aspect-ratio:1024 / 682" class="bbc-139onq"/>

फोटो स्रोत, Peppé family

"अलीकडेच पाश्चात्य विद्यापीठांमधील काही बौद्ध संशोधकांनी यासंदर्भात एक गुंतागुंतीचा आणि प्रचलित सत्याला आव्हान देणारा तर्क मांडला आहे. ज्याद्वारे त्यांना असं मानलं जाऊ शकतं, की ही एक संशोधकांनी मांडलेली रचना आहे, जी सामान्यपणे शोधाचा तपशील माहित असलेले बौद्ध लोक मांडत नाहीत," असं ते म्हणाले.

क्रिस पेप्पे म्हणाले की "त्यांच्या कुटुंबानं हे अवशेष मंदिरं आणि संग्रहालयांना दान करण्याचाही विचार केला. मात्र बारकाईनं तपासणी केल्यावर त्या सर्वांनीच वेगवेगळ्या समस्या मांडल्या."

"लिलाव हाच, हे अवशेष बौद्धांना हे अवशेष हस्तांतरित करण्याचा सर्वात योग्य आणि सर्वात पारदर्शक मार्ग दिसतो. आम्हाला खात्री आहे की सदबीज ते नक्कीच साध्य करेल," असं क्रिस म्हणाले.

काहीजण कोहिनूर हिऱ्याकडेही लक्ष वेधतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं हा हिरा ताब्यात घेतला होता आणि आता तो क्राऊन ज्वेल्सचा भाग आहे. अनेक भारतीय याकडे हिऱ्याची चोरी म्हणूनही पाहतात. आता त्यात भगवान बुद्धांच्या रत्नांची भर पडावी का?

"माझ्या मते, अवशेष त्याच्या मूळ ठिकाणी परत आणणं क्वचितच आवश्यक असतं. असे दुर्मिळ आणि पवित्र अवशेष, जे अद्वितीय आहेत आणि जे त्या भूमीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याकडे सरकारनं अपवादात्मक लक्ष दिलं पाहिजे," असं अहुजा म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)