राजस्थानात 5 मुलींवर बलात्कार, फोटो-व्हीडिओंद्वारे ब्लॅकमेल; कसं उघडकीस आलं प्रकरण?

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
- Author, मोहर सिंग मीणा
- Role, जयपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थानमधील अजमेरमध्ये पाच विद्यार्थिनींवर कथितरित्या बलात्कार आणि त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आज एक मार्चला हिंदुत्ववादी संघटनांनी 'अजमेर बंद'ची हाक दिली आहे.
आज सकाळपासूनच इथे बाजार, शाळा-कॉलेज आणि सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत.
या बंदला व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिली आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारीला अजमेर विभागातील किशनगड, भिलवाडा आणि बेवार जिल्ह्यात हिंदू संघटनांनी रॅली काढली होती.
अजमेर विभागातील बेवार जिल्ह्यातील विजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 16 फेब्रुवारीला तीन एफआयआर दाखल झाल्या. या एफआयआरमध्ये शालेय वयातील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप तसेच त्यांच्यावर बलात्कार आणि धर्मांतरण करण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आल्याचाही आरोप झाला आहे. या आरोपांसहित इतरही अनेक आरोप करण्यात आले आहेत.
स्थानिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये माजी नगरसेवकासहित 12 जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर आठ आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे तर माजी नगरसेवक हाकिम कुरेशी यांना पोलिसांनी रिमांडमध्ये घेतलं आहे.
या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींना सध्या बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणात हिंदू संघटना आक्रमक होत चालल्या आहेत.


विजयनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख करण सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "सोळा तारखेला तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पाच अल्पवयीन पीडिता आहेत. त्या सर्व एकाच शाळेतील विद्यार्थीनी आहेत."
पोलिसांनी या पीडित मुलींच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पॉक्सो कायद्याअंतर्गतही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक एसपी सज्जन सिंह यांनी म्हटलं की, "या प्रकरणामध्ये आम्ही बारा जणांना अटक केली आहे. यातील तीन अल्पवयीन आरोपींना आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे. माजी नगरसेवक हाकिम कुरेशी आरोपी असून त्यांना रिमांडमध्ये घेण्यात आलं आहे. इतर आठ आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे."

फोटो स्रोत, Ravindra Singh
आतापर्यंतच्या तपासामध्ये किती पीडिता आढळल्या आहेत तसेच या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढू शकते का, या प्रश्नांवर सज्जन सिंह यांनी म्हटलं की, "पाच पीडितांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, या प्रकरणातील पीडितांची संख्या वाढण्यासारखं काहीही समोर आलेलं नाहीये."
मात्र, फोटो-व्हीडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणं तसेच धर्मांतरणासाठी दबाव निर्माण करण्यात आल्याचाही आरोप या प्रकरणातील पीडित मुलींनी केला आहे.
राज्यपाल म्हणतात, 'इथून पुढे हे चालणार नाही'
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री भजनलाल शर्मांकडून या प्रकरणाबाबत अद्याप तरी कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाहीये.
माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 18 फेब्रुवारी रोजी 'एक्स'वर मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत लिहिलंय की, "भाजपच्या सत्ताकाळात असुरक्षिततेमुळे आता मुलींना घरातून बाहेर पडणंही बंद होणार आहे का");