अनुराग कश्यप: ब्राह्मणांबद्दल अनुराग कश्यप काय म्हणाला, त्यामुळे वाद का निर्माण झाला?

अनुराग कश्यप यांनी अनेकदा सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनुराग कश्यप यांनी अनेकदा सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे

अनुराग कश्यप आणि वाद यांचं जुनं नातं आहे. अनुराग कश्यप हे एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत असं अनेकांचं मत असलं तरी ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. त्यांची रोखठोक भूमिका, अनेक मुद्द्यांबाबतचा स्पष्टवक्तेपणा, परखडपणा यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होतात.

आता 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांबाबत काही संघटना आणि सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेनंतर अनुराग कश्यप यांनी काही वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद पेटला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या एका जातीय वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे.

या वक्तव्यानंतर अनुराग कश्यप यांनी दावा केला की त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना विविध धमक्या दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी माफीदेखील मागितली आहे.

अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यावर काही प्रसिद्ध लोकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज मुंतशिर यांनी तर अनुराग कश्यप यांना उघड आव्हानदेखील दिलं आहे.

मात्र अनुराग कश्यप वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील ते अनेक वादांमध्ये सापडले आहेत.

याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ते नेहमीच रोखठोक, स्पष्टवक्तेपणानं बोलतात. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सच्या 'अडोलसेंस' या वेबसेरीजवरून देखील अनुराग कश्यप यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या एका जातीय वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या एका जातीय वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

अनुराग कश्यप यांनी अनेकदा सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे. त्यामुळे 'उडता पंजाब' (2016) हा चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डात बराच संघर्ष झाला होता.

वादांशी अनुराग कश्यप यांचं जुनंच नातं आहे. रोखठोक वक्तव्यं करणं असो की सोशल मीडियावरील पोस्ट असो की कौटुंबिक नातेसंबंध असो की चित्रपट कंपनीतील भागीदाराबरोबरचं भांडण असो, अनुराग कश्यप अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.

सध्याचा वाद काय आहे?

हा वाद 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू झाला होता.

प्रसारमाध्यमांमधील काही बातम्यांमध्ये हा दावा करण्यात आला होता की 'फुले' चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवली आहे. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती.

त्यात त्यांनी लिहिलं होतं, "धडक-2" चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळेस सेन्सॉर बोर्ड म्हणालं होतं, मोदींनी भारतात जातिव्यवस्था संपवून टाकली आहे. त्याच आधारे 'संतोष' हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही."

ग्राफिक्स

अनुराग कश्यप म्हणाले, "आता ब्राह्मणांना 'फुले' चित्रपटाबद्दल अडचण आहे. भाऊ, जर जातिव्यवस्था नाही तर मग ब्राह्मण कसे काय आहेत. जर जातिव्यवस्था नव्हती तर मग ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई कुणाविरोधात लढले होते");