नाना पाटेकर यांनी अमित शहांना भेटण्यामागे राजकीय अर्थ?

नाना पाटेकर, अमित शहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नाना पाटेकर, अमित शहा

अभिनेते नाना पाटेकर यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्यामागे नवी राजकीय गणितं असावीत अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकेकाळी मनसे आणि मनसेप्रमुख यांच्यांशी वैचारिक जवळीक असणारे नाना पाटेकर आता भाजपच्या वाटेवर असावेत अशी चर्चा आहे.

नाना पाटेकर आणि अमित शहा यांच्या भेटीमागे अर्थ असावा असं म्हटलं जात असलं तरी नाना पाटेकर यांनी ही वैयक्तिक कामासाठीची भेट होती असं सांगितलं आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क केले जात आहेत. 'राजनिती', 'देऊळ' आणि इतर काही चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी राजकारण्यांची भूमिका केली होती. आता नाना पाटेकर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही राजकीय नेते होतात का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

नाना पाटेकर यांनी या आठवड्यामध्ये कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त प्रदेशाला भेट देऊन मदतीची घोषणा केली होती तसेच त्यांच्या 'नाम फाऊंडेशन'ला मदत करण्याचं आवाहनही लोकांना केलं होतं.

राज ठाकरे आणि नाना पाटेकर

यापूर्वीही राज ठाकरे यांनी आपल्या अभिनय आणि नाम फाऊंडेशनच्या कामाबरोबर अनेकदा आपली मते स्पष्ट मांडली आहेत. त्याचे राजकीय वर्तुळात पडसादही उमटले होते. 2017 साली नोव्हेंबर महिन्यात फेरीवाल्यांच्याविरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेबद्दल एका कार्यक्रमात आपले मत मांडले होते.

ते म्हणाले होते, "सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, अतिक्रमण नसावं असं माझंही मत आहे. पण दोनवेळच्या माझ्या भाकरीसाठी मी (भाजीवाले) काम करत आहे. ते जर नाही मिळालं तर मी तुमच्या हातचं हिसकावून घेईन, त्यामुळे मला काम करू द्या. इतकी वर्ष कार्पोरेशननं का नाही जागेची आखणी केली? फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. आपण कार्पोरेशनला याचं उत्तर विचारलं नाही."

यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना भर कार्यक्रमात त्यांची नक्कल करून उत्तर दिलं होतं. तसंच 'महात्मा नाना पाटेकर' अशा शब्दांमध्ये त्यांचा उल्लेख केला होता.

"माहीत नाही अशा गोष्टीत चोंबडेपणा करणं नाना पाटेकरनं थांबवावं" असा सल्ला राज यांनी दिला होता.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

राज यांनी भर कार्यक्रमात अशा प्रकारे खिल्ली उडवल्यावर नाना पाटेकरांनी त्यांचं (राज ठाकरेंचं) काहीच नुकसान झालं नाही पण त्यांचं एक मत कमी मात्र नक्की कमी झालं अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली होती. यामुळे नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं मानलं जातं.

'मीटू' प्रकरण

त्यानंतर 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नव्याने केल्याने खळबळ उडाली होती.

"नाना पाटेकर बॉलिवुडमधील अनेक महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, पण यावर कुणाची बोलायची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकावल्याचंही", तनुश्रीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

नाना पाटेकर यांच्याविरोधात 'मीटू' मोहिमेमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी आरोप केल्यावर राज ठाकरे यांनी नाना पाटेकर असे वागणार नाहीत असे सांगितले होते. "नाना पाटेकर कधीकधी मूर्खपणा करतो, कधीकधी उद्धटपणा करतो, वेड्यासारखा करतो. तो उत्तम कलाकार आहे सगळं खरं आहे. पण नाना अशी काही गोष्ट करेल असं मला वाटत नाही", असं जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या कार्यक्रमात आपल्यासाठी शरद पवार आदर्श असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

तेव्हा नाना म्हणाले होते, "नकळत्या वयात आपल्याला हिरो लागतो, आदर्श लागतो. तेव्हा शरदराव (पवार) माझे हिरो होते, आदर्श होते. माणूस काहीतरी करून दाखवेल असं वाटायचं" अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच अजित पवार यांचंही त्यांनी कौतुक केलं होतं.

"अजित माझा कालही मित्र होता, आजही आहे आणि उद्याही राहील. जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे काही मागेन त्या दिवशी माझ्यावर माझ्या किंमतीचा टॅग लागेल. आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला आहे. यापलिकडे देवाकडेही काही मागण्याची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तर तो नाही म्हणणार आहे का");