प्रवीण तरडे : 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक उरवडेमधील आग दुर्घटनेनंतर पुन्हा चर्चेत का आलेत?

प्रवीण तरडे

फोटो स्रोत, Pravin Tarade/Facebook

  • Author, अनघा पाठक
  • Role, बीबीसी मराठी

"तुमचे आई-वडील, नातेवाईक, भाऊ, बहीण कुठे काम करतात ती जागा जाऊन पहा," अशा आशयचं वक्तव्य मराठी चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या एका कंपनीला लागलेल्या आगीनंतर केलं होतं.

मुळशी तालुक्यातल्या उरवडे गावात सोमवारी, 7 जूनला, एका केमिकल फॅक्टरीत आग लागल्यामुळे 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातल्या औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या प्रश्नांबद्दल प्रवीण तरडे सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात भावना व्यक्त करतायत. आगीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्हही केलं होतं.

तिथे जाऊन आसपासच्या 129 गावांमधल्या सरपंचाना एकत्रित करून या औद्योगिक क्षेत्रांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करायला कंपन्यांना भाग पाडणार असल्याचंही त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

प्रवीण तरडे नक्की काय म्हणाले?

"आग लागल्यानंतर आमच्या मुळशीच्या पोरांनी त्या 18 डेडबॉडी बाहेर काढल्यात. इथे भिंतीला लावून मशीन ठेवलेली दिसतायत. कुठे त्या भगिनी उभ्या असतील, नक्की काय झालं असेल, याचा विचार करायला हवा. अतिनिष्काळजीपणा हा ठरवून केलेल्या गुन्ह्यासारखाच असतो," असं ते फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना दिसतंय.

"मुळशीतल्या प्रत्येक गावच्या लोकांना मी विनंती करतो की या कंपन्या येऊन आतून पाहा. आपली आई, बहिणी, भाऊ नवरा, बायको कुठे काम करतात ते जाऊन पाहा, नाहीतर आपले भाऊबंद असेच जळून मरतील," असंही ते पुढे म्हणाले होते.

मुळशीतल्या शेतजमिनी, त्यावर लँडमाफियांचं झालंलं आक्रमण, जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यानंतर गुन्हेगारी टोळ्यांचा झालेला उदय यावर तरडेंनी 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपटही काढला होता.

प्रवीण तरडे, पुणे आग, पिरंगुट, मुळशी
फोटो कॅप्शन, पुण्यातील दुर्घटनेचं दृश्य

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "या भागाला मुळात MIDC का म्हणायचं हा प्रश्न आहे. मी स्वतः तिथे तीन वर्षं काम केलं आहे. पण MIDC ला लागू होणारी कुठलीच गोष्ट तिथे नाहीये. सगळ्या प्रकरणात व्हिलन कोण असेल तर व्यवस्था. इथला ले-आऊट सँक्शन कोणी केला? सेफ्टी ऑडिटला कोणी मान्यता दिली, फायर ऑडिट कोणी दिलं? याच्यावर कोणी बोलताना दिसत नाही."

व्हीडिओ कॅप्शन, पुण्यात सॅनिटायझर फॅक्टरीच्या आगीत नवरा वाचला, बायको दगावली

या भागात ज्यांनी काम केलंय आणि आता रिटायर्ड झालेत अशा लोकांना जाऊन भेटणार आहे असंही तरडे म्हणाले. "मला हे विचारायचं आहे की लेआऊट नक्की सँक्शन होतो कसा? मी शेतकऱ्यांचं दुःख मांडलं, त्यापेक्षा इथल्या कामगारांचं दुःख भयाण आहे. लोक प्रचंड वाईट परिस्थितीत काम करत आहेत."

'कंपनीत आग लागू शकते, पण माणसं का वाचू शकली नाहीत'

कंपनीत आग लागणं काही नवीन नाहीये, पण माझा प्रश्न असा आहे की इथली माणसं का वाचली नाहीत? असाही प्रश्न तरडेंनी विचारला आहे.

"जर माणसांचे जीव वाचले नाहीत तर इथे नक्कीच काहीतरी चुकलंय. कंपनीच्या मालकालाही बोलून अर्थ नाहीये कारण 18 माणसं मारण्यासाठी त्याने नक्कीच कंपनी काढली नव्हती. याआधी 10 वर्षं ही कंपनी चालूच होती. माणस मारली ती प्रशासनाने. 11 वर्षांपूर्वी 32 गुंठे जागा फायर ब्रिगेडसाठी मंजूर झाली होती पण अजूनही तिथे काही झालं नाही याचं कारण काय");